ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
विमानतळ शनिवारी दिवसभर ‘लॉक’

अमरावती : भारत-पाकदरम्यान युद्धसदृश्य स्थिती व एकमेकांवर हवाई हल्ले सुरू असताना देशभरात खबरदारी घेण्याच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने राज्यातील अनेक विमानतळांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अशातच शनिवारी अमरावती विमानतळसुद्धा बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे विमानतळावर दैनंदिन कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांनासुद्धा आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. शनिवारी अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण नव्हते, हे विशेष. शनिवारला पाकिस्तान आर्मीतून बोलत असल्याची बतावणी करून बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा व्हॉटसअॅप कॉल एमआयडीसीतील एका कामगाराला आला. त्यानंतर पोलिसांनी अमरावती शहरासह जिल्ह्यात हायअलर्ट घोषित केला. यानंतर अमरावती विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली.